५००० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
श्रीगोंदा दि.२७ मार्च २०२५
तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागितली, तडजोडी अंतर्गत पाच हजाराची रक्कम ठरली. ही लाचेची रक्कम घेताना दुय्यम निबंधकाला अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा येथे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवलेल्या दस्ताच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक सचिन खताळ याने तक्रारदार वैभव मेहता यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर दि.26 रोजी सचिन खताळ तक्रारदार मेहता यांना म्हणाले की,मी तुम्हाला सकाळीच बोललो आहे तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या हिशोबाने करा. फक्त व्यवस्थित असे म्हणून पाच हजार लाचेची मागणी करत ती स्वीकारण्याचे मान्य केले. व ती स्वीकारताना दुय्यम निबंधक खताळ याला लाच-लुचपत विभाग अहिल्यानगर यांनी रंगेहात पकडले.
तक्रारदार वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक 1171 मधील 5 हेक्टर 68 आर क्षेत्रापैकी 28 आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी दुय्यम निबंध सचिन खताळ यांच्याकडे दिला होता. खताळ यांनी याच कामासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली व तडजोडी आणती पाच हजार रुपये लाच मागितली. ही लाच स्वीकारताना खताळ यांना लुचपत विभागाने रंगेहात पकडले. खताळ यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत.
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी ही कारवाई केली.
चौकट
काल श्रीगोंदा शहरात एकाच दिवसात तहसीलदार क्षितिजा वाघमारे नायब तहसीलदार अमोल बन व दुय्यम निबंधक सचिन खताळ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.