Nagari Punch https://nagaripunch.com Thu, 29 May 2025 15:34:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://nagaripunch.com/wp-content/uploads/2024/10/wp-1727982521960-150x150.png Nagari Punch https://nagaripunch.com 32 32 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी गौरव महोत्सवाची भव्य सुरुवात! https://nagaripunch.com/punyashlok-ahilyadevi-holkar-trishtabdi-gaurav-festival/ https://nagaripunch.com/punyashlok-ahilyadevi-holkar-trishtabdi-gaurav-festival/#respond Thu, 29 May 2025 15:34:03 +0000 https://nagaripunch.com/?p=6409 माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य शोभायात्रेचा शुभारंभ

नगर दि.२९मे २०२५

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जनसेवा फाउंडेशन व विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अहिल्यानगर गौरव दिन” महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात करण्यात आला.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेची सुरुवात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ही शोभायात्रा दिल्लीगेट-बालिकाश्रम रोड येथून प्रारंभ होऊन प्रोफेसर चौक येथे संपन्न झाली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही मिरवणूक एका ऐतिहासिक सोहळ्यात रूपांतरीत झाली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा पथकं, विविध धर्म-जातीतील महापुरुषांच्या मूर्ती, देवदेवतांचे रथ आणि जिल्ह्यातील पारंपरिक नृत्यप्रकारांनी संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.

हा गौरव महोत्सव तीन दिवस चालणार आहे. दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, तिसऱ्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित एक प्रसिद्ध नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. त्याद्वारे महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

डॉ. विखे पाटील यांनी अभिमानाने नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा महोत्सव अहिल्यानगरमध्ये भव्य स्वरूपात साकारण्यात आला असून, संपूर्ण महाराष्ट्रभर तो साजरा होत आहे, ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे.

या भव्य सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, स्वागताध्यक्षा धनश्री विखे पाटील, विचार भारतीचे अध्यक्ष राजाभाऊ मुळे, भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी मन:पूर्वक आभार मानले. यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून सर्व उपस्थितांना त्रिशताब्दी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

]]>
https://nagaripunch.com/punyashlok-ahilyadevi-holkar-trishtabdi-gaurav-festival/feed/ 0
टोलबद्दल खा.लंके यांना अधिक माहिती असेल,त्यामुळे त्यांनी आंदोलन केले. आ. पाचपुते https://nagaripunch.com/kha-lanka-knows-more-about-the-toll-because-he-agreed-to-agitate/ https://nagaripunch.com/kha-lanka-knows-more-about-the-toll-because-he-agreed-to-agitate/#respond Tue, 27 May 2025 16:06:26 +0000 https://nagaripunch.com/?p=6406 नुकसानीचे पंचनामे करा : पाचपुते

श्रीगोंदा : दि.27 मे 2025

श्रीगोंदा-अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह इतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रीगोंदा येथील आढावा बैठकीत दिल्या.

श्रीगोंदा-अहिल्यानगर तालुक्यांत पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पिकांचे पंचनामे करण्याचे दिलेले आदेश, मुंबईत होत असलेले विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सोमवारी श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. निमगाव खलू येथील टोलमाफीसाठी वीस किलोमीटर परिसरातील वाहनांना सूट देण्याबाबत तीन-चार दिवसापूर्वी आंदोलन करण्यात आले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता वाहनांना सूट देण्याचा सरकारी आदेश नाही. त्यामुळे टोलमधून सूट देता येत नसावी. याबाबत खासदार नीलेश लंके यांना अधिक माहिती असेल,त्यामुळे त्यांनी आंदोलन केले. त्यांच्याकडे टोल माफीचा शासन निर्णय असेल, तर तो मला आणून द्यावा. मी पुढे होऊन टोल माफीसाठी प्रयत्न करील. मात्र, समाजात चुकीची माहिती पसरविणे बरोबर नाही, असा टोला विक्रमसिंह पाचपुते यांन लगावला.

इतर सिमेंट प्रकल्प पाहावेत

निमगाव खलू येथील सिमेंट कंपनीचा प्रकल्पाबाबत घेतलेल्या हरकती नियमाला धरून असतील, तर प्रकल्प होणार नाही. प्रकल्प आल्यावर परिसराचा विकास होतो. मात्र, प्रकल्पामुळे नुकसान होणार असेल, तर नियमाला धरून नसेल, तर विरोध करावा लागेल. मात्र, त्या अगोदर इतर सिमेंट प्रकल्प शेतकऱ्यांनी पाहून यावेत. मगच फायनल निर्णय घेऊ, असेही पाचपुते म्हणाले.यावेळी कार्यकरते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

]]>
https://nagaripunch.com/kha-lanka-knows-more-about-the-toll-because-he-agreed-to-agitate/feed/ 0
जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार -ना. विखे पाटील https://nagaripunch.com/will-not-provide-all-facilities-to-the-dindi-in-the-district-or-vikhe-patil/ https://nagaripunch.com/will-not-provide-all-facilities-to-the-dindi-in-the-district-or-vikhe-patil/#respond Mon, 26 May 2025 10:51:00 +0000 https://nagaripunch.com/?p=6403 दिंडीच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष 

अहिल्यानगर, दि.26 मे 2025

जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून,या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सूरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प.अशोक सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्ग सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होतात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्ग निर्हेण ते शेगुड पर्यंत रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे. साईड पट्ट्या दुरूस्त कराव्यात‌. दिंडी मार्गावरील पारेगाव येथे मुलभूत सुविधा पुरवाव्यात. संपूर्ण पालखी मार्गावर रूग्णवाहिका तयार ठेवण्यात यावेत. दिंड्याच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात यावे.

यावर्षी पालखीच्या सुरूवातीलाच पाऊस होत आहे, त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा म्हणून यापुढे पावसाचे अंदाज वर्तविणारी अद्यावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे‌. जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.‌ प्रत्येक दिंडीत पुरेसे औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

श्री.विखे पाटील म्हणाले, ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व शौचालयाची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या अडचणी यावर्षी दूर केल्या जातील. वारकऱ्यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल.

वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पालखीमार्गावर आवश्यक साधनांसह तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर देवस्थानाचा ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रत्येक दिंडीला २० हजार रूपये अनुदान व प्रत्येक वारकऱ्यास पाच लाख रूपयांचा विमा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेकवेळा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्याने अनेक वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्याकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ‘हरित वारी – निर्मल वारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार शिवाजीराव‌ कर्डीले, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ यांनीही वारीच्या नियोजनाच्या दृष्टीने सूचना केल्या.

या बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ७६ दिंडीचे प्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

]]>
https://nagaripunch.com/will-not-provide-all-facilities-to-the-dindi-in-the-district-or-vikhe-patil/feed/ 0
श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे अपात्र https://nagaripunch.com/atul-lokhande-chairman-of-shrigonda-bazar-committee/ https://nagaripunch.com/atul-lokhande-chairman-of-shrigonda-bazar-committee/#respond Mon, 26 May 2025 09:34:11 +0000 https://nagaripunch.com/?p=6400 श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे अपात्र

श्रीगोंदा दि.26 मे 2025

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती अतुल लोखंडे संचालक व सभापतिपदावरून अपात्र असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काढला आहे. बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारातील अनियमिततेमुळ त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

बाजार समिती निवडणुकीत राहुल जगताप यांच्या गटाने १८ पैकी ११ जागा जिंकल्या. पाचपुते आणि नागवडे गटाने ७ जागा जिंकल्या. सभापतिपदी अतुल लोखंडे तर उपसभापतिपदी मनीषा मगर यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी बाळासाहेब नाहाटा यांचा मुलगा मितेश याचा बाजार समिती निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर नाहाटा व लोखंडे यांच्यातील धुसफूस वाढत चालली होती. अशा परिस्थितीत लोखंडे यांनी बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांना निलंबित केले. त्यामुळे डेबरे दुखावले.

आता सभापतिपदी कोण?

सभापतिपदासाठी सत्ताधारी राहुल जगताप गटातील इच्छुक संचालक अलर्ट झाले आहेत. आता दीपक भोसले, बाबासाहेब जगताप, अजित जामदार यांची नावे पुढे आली आहेत. विरोधी पाचपुते नागवडे गटाकडून महेश दिलीप दरेकर, रामदास झेंडे यांची नावे सभापतीपदासाठी ऐनवेळी पुढे येणार आहेत. अशा परिस्थितीत राहुल जगताप काय खेळी करतात? आमदार विक्रमसिंह व नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे कशा पद्धतीने बाजार समितीत एंट्री करतात हा उत्सुकतेचा विषय राहणार आहे.

लोखंडे यांनी उद्धवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांना तीन बैठकांना गैरहजर राहिल्याचे कारण दाखवून संचालक पदावरून अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांना पाठविला. त्यानंतर नाहाटा-डेबरे यांनी एकत्र येऊन लोखंडे यांना हटविण्यासाठी पाचपुते यांच्या नावाने चाल खेळली असल्याचे समजते.

]]>
https://nagaripunch.com/atul-lokhande-chairman-of-shrigonda-bazar-committee/feed/ 0
मान्सूनपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात ५० टक्के पाऊस https://nagaripunch.com/prior-to-the-monsoon-4-percent-rainfall-in-shrigonda-taluka/ https://nagaripunch.com/prior-to-the-monsoon-4-percent-rainfall-in-shrigonda-taluka/#respond Mon, 26 May 2025 09:27:32 +0000 https://nagaripunch.com/?p=6397 मान्सूनपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात ५० टक्के पाऊस

श्रीगोंदा दि.26 मे 2025

मान्सून दाखल होण्यापूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात सरासरी २३७- मिलीमीटर म्हणजे ५० टक्के इतका पाऊस झाला आहे.शनिवार आणि रविवार तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. शनिवारी तालुक्यात सर्वाधिक पाऊस बेलवंडी मंडलामध्ये १३९ मिलिमीटर इतका, – सर्वात कमी चिंभळे मंडलामध्ये २८ -. मिलीमीटर इतका झाला आहे.यंदा श्रीगोंदा तालुक्यात ओला दुष्काळ पडतो की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र, हा पाऊस साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. पडलेल्या एकूण पावसात कोळगाव मंडल आघाडीवर तर देवदैठण मंडलामध्ये पाऊस कमी म्हणजे १४३

आमदारांनी बोलविली बैठक

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पंचायत समिती आणि कृषी विभागाचा आढावा घेण्यासाठी आज सोमवारी (दि.२६) श्रीगोंद्यात विशेष बैठक बोलविली आहे. या बैठकीत कृषी विभागाला बियाणे, खते नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

मिलीमीटर इतका आहे

मंडलनिहाय पाऊस) कंसात एकूण पाऊस) : श्रीगोंदा ८७ (२३४), काष्टी ७२ (२३१), मांडवगण ९७ (२७०), बेलवंडी १३९ (२७०), पेडगाव ७९ (२८२), चिंभळे २८ (२०२), देवदैठण ३९ (१४३), कोळगाव ११० (३२०), लोणी व्यंकनाथ ९७ (१९०), भानगाव ७९ (२१६), आढळगाव ७३ (२४७).

]]>
https://nagaripunch.com/prior-to-the-monsoon-4-percent-rainfall-in-shrigonda-taluka/feed/ 0
“मी गेलेल्या लग्नात नवरीच पळून गेली होती” डॉ: सुजय विखे https://nagaripunch.com/the-bride-had-escaped-at-the-wedding-i-had-gone/ https://nagaripunch.com/the-bride-had-escaped-at-the-wedding-i-had-gone/#respond Mon, 26 May 2025 09:19:04 +0000 https://nagaripunch.com/?p=6395 राजकीय नेते लग्नाला गेले म्हणून टीका योग्य नाही : डॉ.सुजय विखे-पाटील

हगवणे प्रकरणात पवारांची पाठराखण

अहिल्यानगर : सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणात माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण करीत दोषी लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे, परंतु एखाद्या लग्नात. भेट दिली म्हणून राजकीय व्यक्तींवर टीका करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे.

खडके-वाके (ता. राहाता) येथे निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या तलावाचे जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले, अजित पवार हे होतकरू नेतृत्व आहे. एखाद्या लग्नात उपस्थित राहणे आणि फोटो काढणे चुकीचे नाही. आम्ही देखील अनेक लग्नात भेटी देत असतो. परंतु, लग्नाला भेटी दिलेले अनेक मुले-मुली दुर्दैवाने वेगळे होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मी एका लग्नाला गेलो. स्टेजवर बसलो. नवरदेव आला, पण मुलगी लग्नातून पळून गेली. मग काय करणार ? त्यामुळे अशा गोष्टीत राजकीय व्यक्तींना ओढू नये. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींना शिक्षा मिळाली पाहिजे.

ते पुढे म्हणाले, आमच्यासमोर आलेला कोणतीही व्यक्ती फोटो काढू शकते. फोटो काढल्यावर लोक सांगतात हा वाळू तस्कर आहे, ३०२ चा आरोपी आहे. आता यासाठी कायदा करावा लागेल. गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे. म्हणजे राजकीय लोकांच्या लक्षात येईल.

टीकाकारांना पत्रिका पाठवाव्या लागतील

अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना लग्नपत्रिका येत नाहीत. त्यामुळे दुसरा माणूस लग्नाला गेल्यावर त्यांना त्रास होऊ शकतो.त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गटालादेखील लोकांनी लग्नपत्रिका पाठविल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचे आक्षेप राहणार नाहीत, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

]]>
https://nagaripunch.com/the-bride-had-escaped-at-the-wedding-i-had-gone/feed/ 0
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्‍वारुढ पुतळ्याचे उंबरी बाळापूर येथे अनावरण https://nagaripunch.com/the-grand-horse-of-chhatrapati-shivaji-maharaj-unveils-umbari-balapur%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae/ https://nagaripunch.com/the-grand-horse-of-chhatrapati-shivaji-maharaj-unveils-umbari-balapur%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae/#respond Sun, 27 Apr 2025 12:09:37 +0000 https://nagaripunch.com/?p=6389 छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही – डॉ. सुजय विखे पाटील 

आश्‍वी दि.27 एप्रिल 2025

उंबरी बाळापूर गावातील नागरीकांचे मागील अनेक वर्षांचे स्वप्न गावातील प्रत्येक जाती – धर्माच्या माणसाच्या योगदानातून आज पुर्ण होत आहे. हे स्मारक उभे करण्यात १५ ते ८० वर्षापर्यतच्या गावातील सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. आज गावात महाराजांच्या आगमनामुळे गावची शोभा वाढली असून गावातील अंतर्गत वादामुळे पुतळा बसवण्याचे पुण्यांचे व जबाबदारीचे काम विखे पाटील कटुंबाला मिळाले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि भविष्यात छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्‍वारुढ पुतळ्याचे अनावरण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) सायंकाळी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई यासह सर्व लहान मोठ्या पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून आलेले शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय हे आपले दैवत असून ते आपल्या हृदयात आहेत. महाराजाचे विचार हे बहुजन समाजाला एकत्र घेऊन चालण्याचे होते. त्यामुळे पुतळा उभारणीनतंर गाव विकासाच्या दिशेने नेताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करुन करावे असे आवाहन केले.

आजचा कार्यक्रम हा कोणत्याही पक्षाचा नसून भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे सर्व पक्षीय लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहे. त्यामुळे उंबरी बाळापूर ग्रामस्थांचे कौतुक करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय जेव्हा असेल तेव्हा आमच्यामध्ये जात, धर्म आणि पक्ष आडवा येणार नाही हे सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार काढले. तर उंबरी बाळापूर नंतर कोल्हार आणि शिर्डी या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारत शिवसृष्टी तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चौकट

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात डॉ. विखे पाटील यांनी यावेळी निषेध केला. हा कार्यक्रम पक्षाचा नसला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी जो निर्णय घेतील त्याला गावांचा पाठींबा द्या. असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थिताना केले असता सर्वाना भारत मातेचा जयघोष करत त्याला पाठींबा दिला.

चौकट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरुन गावात अंतर्गत वाद झाल्याचे सांगताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, “गाव जर ठरावीक रक्कम देऊन शांत होत असेल तर, आमच्या पैशाची किंमत आजिबात नाही. आमच्यासाठी कार्यकर्त्याची किंमत ही अधिक आहे. त्यामुळे गाव शांत राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून हे काम केले.” असे सांगून उंबरी बाळापूर गावातील इतर प्रश्नं देखील भविष्यात ताकदीने सोडवून कोणताही प्रश्नं प्रलंबित ठेवणार नसल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

]]>
https://nagaripunch.com/the-grand-horse-of-chhatrapati-shivaji-maharaj-unveils-umbari-balapur%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae/feed/ 0
कल्पनाही करू शकत नाही,इतकी भयान शिक्षा देणार : मोदींचा इशारा… https://nagaripunch.com/modis-warning-will-be-punished-as-terrible-punishment/ https://nagaripunch.com/modis-warning-will-be-punished-as-terrible-punishment/#respond Thu, 24 Apr 2025 12:32:17 +0000 https://nagaripunch.com/?p=6386 ‘मी स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी हा हल्ला केला, त्यांना….’, पीएम मोदींच खूप मोठं वक्तव्य

दिल्ली: दि.24 एप्रिल 2025

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठ वक्तव्य केलं आहे. भारताची Reaction कशी असेल, याची कल्पना पीएम मोदींच्या वक्तव्यातून आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले आहेत.पेहेलगाम येथे दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला. यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे. त्यामुळे भारताच प्रत्युत्तर कसं असेल? याची चर्चा सुरु आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलत होते. बिहारमध्ये ही जनसभा आयोजित करण्यात आली होती. तिथे दहशतवाद्यांच्या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींनी खूप मोठ वक्तव्य केलं आहे. निश्चितच पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई होणार. याआधी सर्जिकल स्ट्राइक नंतर एअर स्ट्राइक केला होता. आताची कारवाई त्यापेक्षा सुद्धा मोठी असेल असे संकेत पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून मिळाले आहेत.

“22 तारखेला दहशतवाद्यांनी पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे मारलं. त्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे. कोटी कोटी देशवासी दुखी आहेत. सर्व पीडित परिवारांच्या दुखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ज्या कुटुंबातील अधिक इलाज चालू आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ गमावला, कुणी जीवनसाथी गमावला आहे. कुणी बांगला बोलत होतं. कोणी कन्नड बोलत होतं. कोणी मराठी, कोणी ओडिया, कुणी गुजराती, तर कुणी बिहारचा लाल होता. आज त्यांच्या मृत्यूवर कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एक सारखं आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली’“आपला आक्रोश एक सारखा आहे. पर्यटकांवरच हल्ला झाला नाही. देशाच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. मी स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली जाईल. त्यांना शिक्षा देणारच. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकीच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

]]>
https://nagaripunch.com/modis-warning-will-be-punished-as-terrible-punishment/feed/ 0
पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान https://nagaripunch.com/shiv-chhatrapati-award-winning-players-and-coaches-at-the-hands-of-guardian-minister/ https://nagaripunch.com/shiv-chhatrapati-award-winning-players-and-coaches-at-the-hands-of-guardian-minister/#respond Sat, 19 Apr 2025 10:42:32 +0000 https://nagaripunch.com/?p=6382 पुरस्कार विजेत्या खेळाडूंमुळे जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला-पालकमंत्री

  • अहिल्यानगर दि.१९-एप्रिल2025

विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आदी उपस्थित होते.

क्रीडा मार्गदर्शकाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या धनुर्विद्या प्रशिक्षक शुभांगी रुपडे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकडे, कबड्डी खेळाडू शंकर गदाई यांचा पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार याच्या भावाने सन्मान स्वीकारला.

चारही खेळाडूंनी अतिशय कष्टाने साध्य केलेले यश खूप महत्वपूर्ण आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील चार खेळाडूचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान व्हावा ही बाब अतिशय भूषणावह असून या यशाने जिल्ह्याच्या क्रिडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी मिळविलेले हे यश इतरांनाही प्रेरक असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले, सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन स्तरावरून होत आहे. जिल्ह्यातील साहसी क्रीडा प्रकारांना पाठबळ देण्यसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून करण्यात येत असून यापुर्वी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी मॅटची उपलब्धता करून देण्यात आली होती. शहरातील क्रीडा संकुलाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याने सर्व सुविधांनी परीपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

]]>
https://nagaripunch.com/shiv-chhatrapati-award-winning-players-and-coaches-at-the-hands-of-guardian-minister/feed/ 0
विकास काम व जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही :आमीन शेख https://nagaripunch.com/we-are-not-opposed-to-development-work-and-renovation/ https://nagaripunch.com/we-are-not-opposed-to-development-work-and-renovation/#respond Sat, 19 Apr 2025 09:03:03 +0000 https://nagaripunch.com/?p=6379 विकास काम व जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही :आमीन शेख

श्रीगोंदा : दि.19 एप्रिल 2025

शेख महंमद बाबा देवस्थान जीर्णोद्धारास आमचा कधी विरोध नव्हता व नाही. माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून देवस्थान सुशोभीकरणही केले आहे. पेव्हिंग ब्लॉक, हायमॅक्स दिवे, अशी विविध कामे लोकवर्गणीसह ट्रस्टच्या माध्यमातून केली आहेत. मात्र, आमच्यावर विकास कामात अडथळा आणल्याचा खोटा आरोप केला जात आहे, अशी माहिती सुफी हजरत शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष व शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या समाधी स्थळाभोवतालची जागा मोकळी करून मिळावी. तसेच, या समाधीस्थळाचा ताबा सांगणारा ट्रस्ट बरखास्त करावा, या मागणीसाठी श्रीगोंदा शहरात गुरुवारी व शुक्रवारी बंद पाळून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनेकांनी आमीन शेख यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती.शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेख यांनी त्यांची भूमिका मांडली.

गत बुधवारी शेख महंमद बाबा देवस्थान जीर्णोद्धारासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आमदार विक्रमसिंह पाचपुते, पोलिस उपअधीक्षक मिलिंद वाखारे, प्रातांधिकारी श्रीनिवास चिंचकर, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, नायब तहसीलदार पंकज नेवसे आदींसह बैठक झाली. या बैठकीत शेख महंमद बाबा दंर्गाह ट्रस्टच्या नावात बदल करून शेख महंमद बुवा देवस्थान करावे, अशी केलेली सूचना आम्ही मान्य केली होती. देवस्थान जीर्णोद्धाराच्या कामासाठी ट्रस्टच्या मान्यतेने एक शासकीय समिती स्थापन करावी लागेल.

या शासकीय समितीत आमदार, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता, ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने एक-एक सदस्य, अशा एकूण सात सदस्यांची समिती राहील. ही समिती स्थापन करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने बैठकीत मान्यता दिली.

यात्रा कमिटीनेच विषय अमान्य केले..

शेख महंमद बाबा यांचे वंशज, पुजारी यांची निवासस्थाने देवस्थानच्या जागेतच बांधून द्यावीत. देवस्थानबाबत न्यायालयात असलेले सर्व दावे ट्रस्ट मागे घेईल. यात्रा कमिटीच्या वतीनेही न्यायालयातील दावे मागे घेण्याचे बैठकीत ठरले. मात्र, यात्रा कमिटीने हे ठरलेले विषय अमान्य केले, असे आमीन शेख यांनी म्हटले आहे. देवस्थानचा विकास करण्यासाठी आमची सर्वांना बरोबर काम करण्याची तयारी आहे, असेही शेख यांनी सांगितले.

]]>
https://nagaripunch.com/we-are-not-opposed-to-development-work-and-renovation/feed/ 0