ताज्या बातम्याअवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे...

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

spot_img
spot_img

तालुक्यात दोन दिवसापासून अवकाळी व वादळी वाऱ्याचा पाऊस 

श्रीगोंदा दि.15 मे 2024

श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत,

 

अशी मागणी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे.

 

नागवडे यांनी म्हटले आहे की, सोमवार (दि. १३) मे रोजी तालुक्यात व इतरत्र मोठ्या प्रमाणात अवकाळी वादळी पाऊस झाला. वादळाच्या प्रभावाने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झालेले आहे.

 

श्रीगोंदा तालुक्यामध्ये फळबागांचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी फळबागांवर जीवापाड प्रेम करुन त्यांचे संगोपन व संवर्धन करीत आहेत. परंतु सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 

त्यामुळे त्यांना शासकीय पातळीवर मदतीचा हात मिळण्याकरीता नुकसानग्रस्त फळबागांची पाहाणी करून त्वरीत पंचनामे होणे गरजेचे आहे. त्याकरीता संबंधीत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी राजेंद्र नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे केली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

 

 

लेटेस्ट न्यूज़