ताज्या बातम्याआ. पाचपुतेंचा जनता दरबार ठरला "मास्टरस्ट्रोक"

आ. पाचपुतेंचा जनता दरबार ठरला “मास्टरस्ट्रोक”

spot_img
spot_img

श्रीगोंद्यात निर्माण केला लोकाभिमुखतेचा नवा आदर्श

श्रीगोंदा दि.3 जून 2025

 श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या ‘जनतादरबार’ या उपक्रमाला गेल्या चार महिन्यापासून सातत्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिन्याच्या दर सोमवारी श्रीगोंद्यातील माऊली निवासस्थान आवारात आयोजित होणाऱ्या या दरबारात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात.

जनता दरबार सुरू करताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गे लागले पाहिजेत. प्रशासनाबाबत जनतेला प्रश्नच उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना देखील त्या प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे आ. विक्रम पाचपुते यांनी सांगितले.

चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या जनता दरबारात आलेल्या तक्रारींची दखल घेत अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केल्याने सुरुवातीला आलेल्या ४०० च्या वर असलेला तक्रारींचा आकडा चार महिन्यात १७५ आला असल्याचे सांगत शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करत जनता दरबार अविरत सुरू राहणार असल्याचे यावेळी आमदार पाचपुते यांनी सांगितले.

सोमवार दि. २ जून रोजी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व प्रमुख कर्मचारी यांच्यासोबत नागरिकांचे प्रलंबित कामे मार्गी तत्काळ लागण्यासाठी आ. पाचपुते यांच्याकडून जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. जनता दरबारात नागरिकांकडून १७५ प्रकरणे उपस्थित करण्यात आली होती.

अनेक प्रकरणे जनता दरबारात मार्गी लावण्यात आली. बहुतांश प्रकरणे महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन तसेच भूमी अभिलेख कार्यालय यांच्या बाबतीत होती. यावेळी प्र. तहसीलदार प्रवीण मुदगुल, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय होके उपस्थित होते.

या दरबाराचे वैशिष्ट्य म्हणजे, तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी देखील यासाठी बोलावले जातात. त्यामुळे अनेक समस्या त्याच ठिकाणी आणि तत्काळ मार्गी लावल्या जातात. आतापर्यंत तब्बल 300हून अधिक तक्रारी मार्गी लागल्या आहेत. सलगपणे चाललेल्या या उपक्रमामुळे लोकांना विश्वास वाटतो की, त्यांची अडचण कुणीतरी ऐकणारे आहे.

सकाळी ९ ते दुपारी 5 या वेळेत आमदार पाचपुते स्वत: जनतेसमोर उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतात, त्यांचा सखोल विचार करतात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. एखाद्या कामाला वेळ लागणार असल्यास तेही स्पष्टपणे सांगतात; तसेच काम शक्य नसेल तर तसेही स्पष्ट करतात.कधी कधी काही अपरिहार्य कारणास्तव आमदार पाचपुते यांना सोमवारी उपस्थित राहणे शक्य होत नसते. अशा वेळी नागरिकांना याची पूर्वकल्पना दिली जाते. त्यामुळे फक्त एक सोमवार वगळता हा उपक्रम महिन्याच्या दर सोमवारी अखंडपणे सुरू आहे.

या उपक्रमात महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक सहभागी होतात. जनता दरबार हा एक प्रकारचा लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा संवादमंच ठरला आहे.

या लोकोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रमामुळे आमदार विक्रम पाचपुते यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ झाली आहे. लोकांशी थेट संवाद, पारदर्शकता आणि कामाचा सातत्यपूर्ण प्रयत्न या तीन आधारस्तंभांवर उभा असलेला जनता दरबार हा श्रीगोंदा तालुक्यात लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श ठरतो आहे.

लेटेस्ट न्यूज़