ताज्या बातम्याबचत गटांच्या घोटाळेबाजांचा "आका" कोण ? कारवाई पेक्षा "तडजोडी"साठीच फिरतोय फोन..!

बचत गटांच्या घोटाळेबाजांचा “आका” कोण ? कारवाई पेक्षा “तडजोडी”साठीच फिरतोय फोन..!

spot_img
spot_img

बचत गटांच्या घोटाळेबाजांचा “आका” कोण ?कारवाई पेक्षा “तडजोडी”साठीच फिरतोय फोन..!

श्रीगोंदा दि २३ मार्च २०२५

तालुक्यातील बचत गटाला मिळणाऱ्या कर्जात व अनुदानात काही घोटाळेबाज महिलांनी स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून रेंगाळत चाललेला तपास बऱ्याच शंका उपस्थित करतो आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या उत्तरांमध्ये सरळ सरळ विसंगती दिसतेय.

तालुक्यात दोन ते अडीच हजार बचत गट असून यामध्ये अनेक महिला सहभागी आहेत. सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी  प्रत्येक बचत गटाला सीआयएफच्या माध्यमातून साठ हजार रुपये रक्कम देत असते. त्या रकमेतून महिला नवउद्योजक तयार होत असतात. परंतु तालुक्यात काही महिलांनी मार्गदर्शन करत असताना सरकारकडून येणारी रक्कम आपण वेगळ्या व्यवसायात वापरू असे आमिष दाखवून सर्व सामान्य महिलांना खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून कोरे धनादेश घेतले. आणि एका खाजगी संस्थेच्या खात्यात वटवले. हे सर्व मोठ्या शिताफिने एक महिला कर्मचारी करत होती. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या या घोटाळ्याकडे पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची साधी नजर सुद्धा गेली नाही का ? का जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले यावरही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कुणाकुणाचे हात काळे झाले आहेत हे सुद्धा लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाही. तसेच या प्रकरणातल्या घोटाळे बांजाचा “आका” कोण ? आणि कोण- कुणाला वाचवण्यासाठी दूरध्वनी फिरवतोय हे सुद्धा लवकरच तालुक्याला कळेल.

राज्य सरकार बचत गटाला विविध योजनेअंतर्गत विशेष कामासाठी निधीवर्ग करत असते. आलेला निधी त्याच कामासाठी वापरला जातो का ? त्यांच्या मासिक, त्रैमासिक सभा घेतल्या जात होत्या का ? मग हे सगळं ऑडिट होत असताना अधिकाऱ्यांना हा एवढा मोठा निधी त्याच कामासाठी वापरला जात नसल्याचं दिसून आलं नाही का ? हाही प्रश्न आहे.

राज्यात एकही क्षेत्र लूट आणि फसवणुकीपासून बाहेर राहिलेलं नाही आणि आता मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाची लूट सुरू झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे आमदार, खासदार व गृहमंत्री यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, यातील प्रमुख आरोपी कोण ? याचा शोध घ्यावा. यामध्ये जसं दिसतंय तसं नाही अनेक मोठमोठे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची बाब दिसून येत आहे. सर्वसामान्य महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा या संदर्भात गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्याकडे माध्यम प्रतिनिधींना बोलण्यासाठी वेळ नाही. व हा घोटाळा उघड झाल्यापासून व प्रसारमाध्यमांमध्ये याची माहिती जसजशी येऊ लागली तसतशा अनेक महिला भयभीत झाल्या आहेत. प्रशासनांकडून या सर्वसामान्य महिलांना कुठलाही दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. या महिला दररोज शेतात राब -राब राबणाऱ्या आहेत. आता मात्र  त्यांना मार्गदर्शनाची गरज असताना अधिकारी मात्र त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत.या गोरगरीब शेतकरी महिला जेव्हा उन्हातान्हात शेतात राबत होत्या तेव्हा त्यांच्या पैशावर घोटाळेबाज ऐशोआराम करत होत्या. हे या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळालंच नाही का ?

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून एवढा मोठा घोटाळा झाला. या प्रकरणात प्रशासनाकडून मात्र मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे. नोटीसा दिल्या पण कोणाला दिल्या हे माहीत नाही कधी दिल्या हे माहीत नाही. फक्त कारवाई सुरू आहे. खुलासा मागविण्यात आला अशी माहिती वरिष्ठ अधिकारी देताना दिसत आहेत.

या प्रकरणात दोषी कोण व किती आहेत आणि कोण कुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतंय या कडे नगरीपंचचे लक्ष असणार आहे.

लेटेस्ट न्यूज़